पोस्ट्स

सकारात्मक विचार..

  माझ्या वाचक मित्रांनो!        ज्याप्रमाणे अस्वच्छ परिसर आणि अस्वच्छ वातावरणामुळे आपल्या शरीरावर परीणाम होतो. आपण आजारी पडतो, आपले शारीरिक स्वास्थ्य बिघडते. त्याप्रमाणे नकारात्मक विचार व नकारात्मक विचार करणारे लोक यांच्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य बिघडते. आपण मनाने व विचाराने आजारी पडू शकतो. आजारी पडू नये म्हणून आपण स्वच्छ वातावरणात राहण्याचा व स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करतो.तसेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी सकारात्मक विचार व सभोवताली सकारात्मक वातावरण अत्यंत महत्त्वाचे असते.          जीवनात सकारात्मक विचार अत्यंत महत्त्वाचे असतात. आपण सकारात्मक विचार केला तर घडणाऱ्या गोष्टीही चांगल्या घडतात. आपण जर नकारात्मक विचार केला तर घडणाऱ्या घटनाही वाईटच असतात.सकारात्मक विचार आपला जीवनदृष्टीकोन बदलतो.सकारात्मक विचार ही एक मानसिक व भावनिक वृत्ती आहे.सकारात्मक विचारांमुळे अनुकूल बदल घडतात सकारात्मक विचार केल्यामुळे आपले नैराश्य दूर होते व आपण प्रयत्न करण्यास तयार होतो,अशा विचारांमुळे आपल्यात ऊर्जा निर्माण होते.आपण जर सकारात्मक विचार केला तर ती गोष्ट क...

नातं

  माझ्या वाचक मित्रांनो!      नातं  किंवा नातेवाईक म्हटंल की ,आपल्या डोळ्यासमोर येतात आपले आईवडील,भाऊ-बहिण,पती-पत्नी,मुलं आणि इतर नातेवाईक. परंतु नातं फक्त रक्ताच्याच लोकांशी असतं का? तेच फक्त आपले नातेवाईक असतात का? नातं या शब्दाचा इतका संकुचित अर्थ आहे का? की आपण नातं या शब्दाची कक्षा कमी केली आहे??      खरंतर नातं हा खूप व्यापक अर्थाचा शब्द आहे.नातं या शब्दात सारं विश्व व्यापलेलं आहे.नातं म्हणजे प्रेम,आपुलकी,जिव्हाळा,स्नेह,माया,ममता आणि बरंच काही.घट्ट बंधन आणि आणि ऋणानुबंध म्हणजे नातं होय.ज्यांच्याविषयी आपल्या मनात आपुलकीची आणि विश्वासाची जागा असते तो आपला नातेवाईक असतो. त्यांच्याशीच आपलं नातं निर्माण होऊ शकतं.ज्याच्या संकटात पुढे आणि आनंदात मागे उभं राहावसं वाटतं त्या प्रत्येकाशी आपलं नातं असतं.         नातं हे कोणाशी ठरवून करता येत नाही.नातं कधी?कुठे?आणि केव्हा निर्माण होईल हेही सांगता येत नाही.परंतु एकदा नातं निर्माण झालं की ते आयुष्यभर टिकतं. खरं नातं शुल्लक कारणांवरून तुटू शकत नाही.नातं हे प्रसंगी फुलाहूनही कोमल पर...

राग व्यवस्थापन

        माझ्या वाचकमित्रांनो!              राग येणं स्वाभाविक गोष्ट आहे.परंतु राग कसा ? केव्हा ? व कुठे व्यक्त करावा याचं तंत्र माहिती असावं. रागाचं व्यवस्थापन करणं ज्याला जमतं त्यालाच जीवनात यश मिळतं.       योग्य वेळी,योग्य पद्धतीने व योग्य ठिकाणी राग व्यक्त करणं यालाच राग व्यवस्थापन असं म्हणतात. राग आल्यावर तो लगेच व्यक्त न करता, त्या प्रसंगावर विचार करावा.परिस्थिती समजून घ्यावी. व आपला राग योग्य वेळी,योग्य शब्दांत किंवा न बोलता कृतीतून राग व्यक्त करावा.       पडणाऱ्या पावसाचं पाणी लगेच वाहून गेलं तर त्या पाण्याचा काही उपयोग होत नाही.ते पाणी वाया जातं. परंतु पावसाचं पाणी अडवलं,साठवलं तर त्या पाण्याचा योग्य उपयोग करता येतो. ते पाणी वाया जात नाही. रागाचंही अगदी तसंच आहे.राग आल्यावर तो लगेच व्यक्त न करता साठवला,थोपवला आणि परिस्थितीनुरूप व्यक्त केला किंवा त्या रागाचं सकारात्मक ऊर्जेत रूपांतर केलं तर राग हा देखील फलदायी ठरेल.      वाहणाऱ्या वार-याला अडथळा आला नाही तर वारा प्रचंड वेगाने ...

क्वालिटी टाईम.

            माझ्य वाचक मित्रांनो  !             सध्याच्या धकाधकीच्या युगात एक गोष्ट  महाग झाली आहे,ती म्हणजे वेळ ! लोकांना एकवेळेस इतरांना पैसे देणे सहजसोपं वाटतं परंतु वेळ देणं अवघड वाटतं.कुटुंबातील लोकसुद्धा एकमेकांना वेळ देऊ शकत नाही.प्रत्येकजण नोकरी- व्यवसायाच्या मागे धाव- धाव धावतोय.टीचभर पोटाच्या खळगीसाठी जीवन महाग झालंय. प्रत्येकाच्या तोंडी फक्त एकच वाक्य असतं.... मला वेळ नाही. वेळच मिळत नाही. अगदी स्वतःसाठी,स्वतःच्या आरोग्यासाठी आणि कुटूंबासाठीही.         मुलांसाठी पालकांना वेळ काढणं अवघड झालं आहे .मुलांना नक्की काय हवं असतं ? मुलांना जर उत्तम घडवायचं असेल,त्यांना अनुभवसमृद्ध बनवायचं असेल तर पालकांनी मुलांना क्वालिटी टाईम देणं आवश्यक आहे. काही पालकांना वाटतं मुलांना खूप सारी खेळणी दिली,खूप खाऊ दिला,भारी-भारी ड्रेस दिले,शाळेची सर्व फी भरली,वह्या-पुसतकं दिली म्हणजे आपलं काम झालं.परंतु या साऱ्या गोष्टी आवश्यक आहेच. परंतु त्या सर्वांहूनही महत्त्वाचं आहे तो म्हणजे मुलांना वेळ देणं.मुलांना त...

एकविसी

                  शुक्रवार ,12 डिसेंबर  2003 रोजी रयत शिक्षण संस्थेच्या आदर्श विद्यालय शिरवळ,ता. खंडाळा,जि.सातारा येथे मी शिक्षक म्हणून रूजू झालो,आणि माझ्या शैक्षणिक कार्यास सुरुवात केली. शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षक म्हणून आज माझी 21 वर्षे पूर्ण झाली. आजही मला माझा  शाळेचा पहिला दिवस जसाच्या तसा आठवतो. 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही मला माझा प्रत्येक दिवस पहिलाच आणि नवीनच  वाटतो. दररोज नवीन काहीतरी शिकावं आणि विद्यार्थ्यांना शिकवावं असं वाटतं. शिक्षक म्हणून घडविण्यात मला माझे आईवडील,आत्या- आणि मामा,माझे सर्व नातेवाईक आणि मला शिकवणारे सर्व शिक्षक,ज्या गुरूजन अध्यापक विद्यालय पाटण,जि. सातारा येथे मी शिक्षक म्हणून घडलो तेथील माझे सर्व गुरूजन,आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शिकवता-शिकवता मीच शिक्षक म्हणून घडत होतो.ते माझे आदर्श विद्यालय व साधना विद्यालय हडपसर येथील विद्यार्थी,आतापर्यंत मला लाभलेले माझे सर्व मुख्याध्यापक आणि सहकारी यांचा मी ऋणी आहे. तुमच्या सर्वांमुळेच मी शिक्षक म्हणून घडलो.        मागे वळून पाहतान...

माणूसकी.

  माझ्या वाचकमित्रांनो!       "खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे ". मातृहदयी कवी साने गुरूजी सांगतात कोणालाही तुच्छ लेखू नये.कुणालाही हिणवू नये.आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहोत. सर्वांशी प्रेमाने वागावे. प्रेम द्यावे आणि घ्यावे. जगात ज्यांना कोणीही नाही त्यांना आधार द्यावा. दु:खी ,कष्टी लोकांना समजून घ्यावे. त्यांचे दु:ख दूर करण्याचा प्रयत्न करावा.      या जगात सर्वात सुंदर काय असेल तर ते माणसाने ,माणसाशी ,माणसासारखे वागणे.माणूसकीने वागणे. ज्याच्याकडे माणुसकी आहे ती व्यक्ती जगातील सर्वात श्रीमंत आणि सुंदर व्यक्ती असते. माणूसकी हा माणसाचा सर्वात सुंदर दागिना आहे.माणूसकी म्हणजे नक्की काय?"माणूसकी म्हणजे "मी" माणूस व बाकीचेही " माणूस  " हे समजून वागणे होय.माणसाने माणसाला समजून घेतले तर जगातील सर्व समस्या दूर होतील.कोणताही भेदभाव राहणार नाही.जो इतरांशी प्रेमाने,मायेने आणि माणूसकीने वागतो त्याच्याच हदयात परमेश्वराचे वास्तव्य असते.        परमेश्वर कुठे असतो. कवी कुसुमाग्रज " स्वातंत्र्यदेवीची विनवणी "या कवितेत म्हणतात, "पन्नाशीची...

राग

        माझ्या वाचक मित्रांनो!           काही परिस्थितीत आपला संयम सुटतो आणि राग अनावर होतो. राग येणं ही नैसर्गिक व स्वाभाविक गोष्ट आहे.परंतु राग नियंत्रित करणं ही प्रयत्नाने सहजसाध्य गोष्ट आहे.राग कधी आणि कुठे व्यक्त करावा? व राग कुठे व्यक्त करू नये ही मनाचा संयम पाहणारी गोष्ट आहे. राग म्हणजे एकप्रकारची त्रासिक स्थिती आहे. राग हा काही काळापुरताच टिकतो. हळूहळू तो कमी होतो. कालांतराने तो संपतोही. राग आल्यानंतर लगेच व्यक्त न होता काही काळ थांबले, काहीच कृती केली नाही तर राग नियंत्रित होतो. राग आल्यावर थांबणं हा एक रामबाण उपाय आहे.         रागाचा परिणाम आपण ज्या व्यक्तीवर रागावतो त्यापेक्षा आपल्यावरच जास्त होतो. आपण एखाद्या व्यक्तीवर रागावतो म्हणजे नेमकं काय? रागावणं हे त्या व्यक्तीवर नसतं तर ते त्या व्यक्तीच्या बोलण्यावर,वागण्यावर प्रासंगिक असतं. काही काळ आपण शांत राहिलो तर तीच व्यक्ती आपल्याला हवीहवीशी वाटते. म्हणजे राग हा क्षणिक आहे.          राग आल्यावर आपण ज्या काही गोष्टी करतो,खरंतर त्या विचार न...