पोस्ट्स

जागरण

          # मनभेद होऊ न देता प्रवृत्तीविरुद् लढा देणारे 'जागरण'           ज्येष्ठ लेखक भारत सातपुते यांचे 'जागरण' हे कादंबरीवजा आत्मचरित्र वाचताना अंगावर शहारे येतात...एक सामान्य जागरण करून उपजिविका करणाऱ्या गोंधळी समाजात ,शेतमजूर व पुढे शाळासेवक झालेल्या भऊ यांचा एक सामान्य मुलगा आपल्या कर्तृत्वाने असामान्य पदाला जाऊन पोहोचतो. स्वतःसाठी जगायचं ठरवलं असतं तर भारत सातपुते या लेखकाने,शिक्षक व आदर्श मुख्याध्यापकाने  खोऱ्याने पैसा ओढला असता. परंतु स्वतःसाठी न जगता लेखक सदैव कुटूंबासाठी,समाजासाठी व विद्यार्थ्यांसाठी जगले. आयुष्यभर व्यसने,भ्रष्टाचार व काॅपी किंवा समाजातील वाईट प्रवृत्तीविरूदध लढले.अक्षरक्षः जागरण केलं.            घरात सुख-समृद्धी नांदावी यासाठी देवापुढे जागरण-गोंधळ घालतात. तसंच लेखक भारत सातपुते यांनी समाजाच्या सुख-समाधान व विकासासाठी सदमार्गाचं जागरण घातलं. स्वतःचा विचार न करता सतत समाजासाठी जगले. तेवत राहिले.जागरण करत राहिले. त्यांचं आत्मचरित्र वाचल्यावर लक्षात येतं ' स्वतःसाठी जगलास त...

एक भाकर तीन चुली...

          पारूबाई या अनाथांची माय सिंधुताई सपकाळच आहेत की काय असाच क्षणभर भास होतो ही कादंबरी वाचताना...         भरउन्हात खळ्यावर जन्माला आलेली अभागी पारूबाई आणि रात्रीच्या काळोखात चिमणीचा  उजेडही सोबतीला नसताना जन्माला आलेला बबू यांचा जीवनपट मनाला स्पर्शून जातो.आणि मनात घर करतो.          जन्म जिथे झाला ते खळं आणि आयुष्यभर कामं केलेली शेतं, नाला - बंडिगची कामं,ताली,रानं,यांनी पारूबाईची साथ कधी सोडलीच नाही. जीवनातील सर्व संकंट,रागराग,द्वेष,गरीबी,दुबळवाडी, भाऊबंदकी,पुरूषांच्या वखवखलेल्या नजरा,सासू - नणंदाचा छळ सहन करूनही पारूबाई कधीही जीवनाला वैतागत नाहीत.  संकटांना पायाखाली घेऊन  ,संकटाच्या छाताडावर उभं राहून पारूबाई स्वाभिमानानं जगतच राहातात. जीवनात हारत नाही. संकटांनी कधीही गर्भगळित होत नाहीत. ही कादंबरी वाचणारा वाचक जीवनातील संकटांना कधीच घाबरणार नाही. त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार कधीही येणार नाही. स्वाभिमानाने  जीवन जगण्याची प्रत्येकात ओढ निर्माण होईन.         ...

असे शिक्षक होणे नाही..

  पाबळच्या ज्ञानपंढरीचे  - पांडूरंग- दैवत.                   ज्यांनी आम्हांला घडवलं त्या श्री. भैरवनाथ विद्यामंदिर पाबळ या शाळेतील अनेक गुरूजनांपैकी एक असणारे ,आमच्या शाळेचे माजी प्राचार्य मा.गाडीलकर सर .          आदरणीय गाडीलकर सर आणि त्या काळातील आमच्या शाळेतील शिक्षक हे केवळ शाळेपुरते शिक्षक नव्हते, तर  तेव्हाचे शिक्षक हे संपूर्ण गावाचे शिक्षक असायचे.गाडीलकर सर हे सुद्धा त्यातलेच एक. आमच्या श्री.भैरवनाथ विद्यामंदिर पाबळच्या ज्ञानपंढरीचे ते पांडूरंगच.        गाडीलकर सर हे आमच्या दोन पिढ्यांचे शिक्षक...माझ्या वडिलांना,आत्या व चुलते यांनाही ते शिकवायला होते. मी आणि माझ्या भावंडानाही ते शिकवायला होते. सरांच्या बाबतीत आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे सरांचा दरारा आणि शिस्त. पाबळची संपूर्ण शाळा जर कोणाला घाबरत असेल तर ती गाडीलकर सरांनाच. गाडीलकर सर हे नाव उच्चारताच किंवा त्यांना लांबून पाहिले तरी पोटात भितीचा गोळा यायचा. इतके सर कडक शिस्तीचे होते. केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांतही सरांच...

चूक नव्हे,शिक्षण..

        माझ्या वाचकमित्रांनो!      " चुका आणि शिका " ही अनुभवपद्धती आपण नेहमीच ऐकतो. चुका होत नाही असा एकही माणूस शोधूनही सापडणार नाही.चुका या काम करणार-यांकडूनच होतात. काही माणसं चुकांकडे दुर्लक्ष करतात.तर काही माणसं चुकांमधून शिकतात. चुकतो तो माणूस. आणि चुकांमधून शिकतो तो शहाणा माणूस.         चूक करणं हा मानवी गुणधर्म आहे.आणि झालेली चूक सुधारणे हे चांगला माणूस असण्याचं लक्षण आहे.झालेली चूक मान्य केली किंवा स्वीकारली की ती सुधारता येते.परंतु काही माणसं चुका स्वीकारत नाहीत. मी चुकू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीत. किंवा काहींना चुका स्वीकारण्याचा कमीपणा वाटतो. आणि अशी माणसं कधीही सुधारू शकत नाहीत. म्हणून चूक झाली तर मोठ्या मनाने चूक मान्य करा व सुधारणा करा.       बरेच जण चूक होऊ नये म्हणून कोणतंही काम करत नाहीत. काम टाळतात. आणि त्यामुळे चुकाच होत नाही. परंतु काम न करणाऱ्या माणसांना कोणताही अनुभव येत नाही. ते निष्क्रिय राहतात. याउलट काम करणारी माणसं चुकतात आणि अनुभवाने शहाणी होतात. चुकांमधून सुधारणा करतात. व ...

सकारात्मक विचार..

  माझ्या वाचक मित्रांनो!        ज्याप्रमाणे अस्वच्छ परिसर आणि अस्वच्छ वातावरणामुळे आपल्या शरीरावर परीणाम होतो. आपण आजारी पडतो, आपले शारीरिक स्वास्थ्य बिघडते. त्याप्रमाणे नकारात्मक विचार व नकारात्मक विचार करणारे लोक यांच्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य बिघडते. आपण मनाने व विचाराने आजारी पडू शकतो. आजारी पडू नये म्हणून आपण स्वच्छ वातावरणात राहण्याचा व स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करतो.तसेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी सकारात्मक विचार व सभोवताली सकारात्मक वातावरण अत्यंत महत्त्वाचे असते.          जीवनात सकारात्मक विचार अत्यंत महत्त्वाचे असतात. आपण सकारात्मक विचार केला तर घडणाऱ्या गोष्टीही चांगल्या घडतात. आपण जर नकारात्मक विचार केला तर घडणाऱ्या घटनाही वाईटच असतात.सकारात्मक विचार आपला जीवनदृष्टीकोन बदलतो.सकारात्मक विचार ही एक मानसिक व भावनिक वृत्ती आहे.सकारात्मक विचारांमुळे अनुकूल बदल घडतात सकारात्मक विचार केल्यामुळे आपले नैराश्य दूर होते व आपण प्रयत्न करण्यास तयार होतो,अशा विचारांमुळे आपल्यात ऊर्जा निर्माण होते.आपण जर सकारात्मक विचार केला तर ती गोष्ट क...

नातं

  माझ्या वाचक मित्रांनो!      नातं  किंवा नातेवाईक म्हटंल की ,आपल्या डोळ्यासमोर येतात आपले आईवडील,भाऊ-बहिण,पती-पत्नी,मुलं आणि इतर नातेवाईक. परंतु नातं फक्त रक्ताच्याच लोकांशी असतं का? तेच फक्त आपले नातेवाईक असतात का? नातं या शब्दाचा इतका संकुचित अर्थ आहे का? की आपण नातं या शब्दाची कक्षा कमी केली आहे??      खरंतर नातं हा खूप व्यापक अर्थाचा शब्द आहे.नातं या शब्दात सारं विश्व व्यापलेलं आहे.नातं म्हणजे प्रेम,आपुलकी,जिव्हाळा,स्नेह,माया,ममता आणि बरंच काही.घट्ट बंधन आणि आणि ऋणानुबंध म्हणजे नातं होय.ज्यांच्याविषयी आपल्या मनात आपुलकीची आणि विश्वासाची जागा असते तो आपला नातेवाईक असतो. त्यांच्याशीच आपलं नातं निर्माण होऊ शकतं.ज्याच्या संकटात पुढे आणि आनंदात मागे उभं राहावसं वाटतं त्या प्रत्येकाशी आपलं नातं असतं.         नातं हे कोणाशी ठरवून करता येत नाही.नातं कधी?कुठे?आणि केव्हा निर्माण होईल हेही सांगता येत नाही.परंतु एकदा नातं निर्माण झालं की ते आयुष्यभर टिकतं. खरं नातं शुल्लक कारणांवरून तुटू शकत नाही.नातं हे प्रसंगी फुलाहूनही कोमल पर...

राग व्यवस्थापन

        माझ्या वाचकमित्रांनो!              राग येणं स्वाभाविक गोष्ट आहे.परंतु राग कसा ? केव्हा ? व कुठे व्यक्त करावा याचं तंत्र माहिती असावं. रागाचं व्यवस्थापन करणं ज्याला जमतं त्यालाच जीवनात यश मिळतं.       योग्य वेळी,योग्य पद्धतीने व योग्य ठिकाणी राग व्यक्त करणं यालाच राग व्यवस्थापन असं म्हणतात. राग आल्यावर तो लगेच व्यक्त न करता, त्या प्रसंगावर विचार करावा.परिस्थिती समजून घ्यावी. व आपला राग योग्य वेळी,योग्य शब्दांत किंवा न बोलता कृतीतून राग व्यक्त करावा.       पडणाऱ्या पावसाचं पाणी लगेच वाहून गेलं तर त्या पाण्याचा काही उपयोग होत नाही.ते पाणी वाया जातं. परंतु पावसाचं पाणी अडवलं,साठवलं तर त्या पाण्याचा योग्य उपयोग करता येतो. ते पाणी वाया जात नाही. रागाचंही अगदी तसंच आहे.राग आल्यावर तो लगेच व्यक्त न करता साठवला,थोपवला आणि परिस्थितीनुरूप व्यक्त केला किंवा त्या रागाचं सकारात्मक ऊर्जेत रूपांतर केलं तर राग हा देखील फलदायी ठरेल.      वाहणाऱ्या वार-याला अडथळा आला नाही तर वारा प्रचंड वेगाने ...