जागरण
# मनभेद होऊ न देता प्रवृत्तीविरुद् लढा देणारे 'जागरण' ज्येष्ठ लेखक भारत सातपुते यांचे 'जागरण' हे कादंबरीवजा आत्मचरित्र वाचताना अंगावर शहारे येतात...एक सामान्य जागरण करून उपजिविका करणाऱ्या गोंधळी समाजात ,शेतमजूर व पुढे शाळासेवक झालेल्या भऊ यांचा एक सामान्य मुलगा आपल्या कर्तृत्वाने असामान्य पदाला जाऊन पोहोचतो. स्वतःसाठी जगायचं ठरवलं असतं तर भारत सातपुते या लेखकाने,शिक्षक व आदर्श मुख्याध्यापकाने खोऱ्याने पैसा ओढला असता. परंतु स्वतःसाठी न जगता लेखक सदैव कुटूंबासाठी,समाजासाठी व विद्यार्थ्यांसाठी जगले. आयुष्यभर व्यसने,भ्रष्टाचार व काॅपी किंवा समाजातील वाईट प्रवृत्तीविरूदध लढले.अक्षरक्षः जागरण केलं. घरात सुख-समृद्धी नांदावी यासाठी देवापुढे जागरण-गोंधळ घालतात. तसंच लेखक भारत सातपुते यांनी समाजाच्या सुख-समाधान व विकासासाठी सदमार्गाचं जागरण घातलं. स्वतःचा विचार न करता सतत समाजासाठी जगले. तेवत राहिले.जागरण करत राहिले. त्यांचं आत्मचरित्र वाचल्यावर लक्षात येतं ' स्वतःसाठी जगलास त...