पोस्ट्स

क्वालिटी टाईम.

            माझ्य वाचक मित्रांनो  !             सध्याच्या धकाधकीच्या युगात एक गोष्ट  महाग झाली आहे,ती म्हणजे वेळ ! लोकांना एकवेळेस इतरांना पैसे देणे सहजसोपं वाटतं परंतु वेळ देणं अवघड वाटतं.कुटुंबातील लोकसुद्धा एकमेकांना वेळ देऊ शकत नाही.प्रत्येकजण नोकरी- व्यवसायाच्या मागे धाव- धाव धावतोय.टीचभर पोटाच्या खळगीसाठी जीवन महाग झालंय. प्रत्येकाच्या तोंडी फक्त एकच वाक्य असतं.... मला वेळ नाही. वेळच मिळत नाही. अगदी स्वतःसाठी,स्वतःच्या आरोग्यासाठी आणि कुटूंबासाठीही.         मुलांसाठी पालकांना वेळ काढणं अवघड झालं आहे .मुलांना नक्की काय हवं असतं ? मुलांना जर उत्तम घडवायचं असेल,त्यांना अनुभवसमृद्ध बनवायचं असेल तर पालकांनी मुलांना क्वालिटी टाईम देणं आवश्यक आहे. काही पालकांना वाटतं मुलांना खूप सारी खेळणी दिली,खूप खाऊ दिला,भारी-भारी ड्रेस दिले,शाळेची सर्व फी भरली,वह्या-पुसतकं दिली म्हणजे आपलं काम झालं.परंतु या साऱ्या गोष्टी आवश्यक आहेच. परंतु त्या सर्वांहूनही महत्त्वाचं आहे तो म्हणजे मुलांना वेळ देणं.मुलांना त...

एकविसी

                  शुक्रवार ,12 डिसेंबर  2003 रोजी रयत शिक्षण संस्थेच्या आदर्श विद्यालय शिरवळ,ता. खंडाळा,जि.सातारा येथे मी शिक्षक म्हणून रूजू झालो,आणि माझ्या शैक्षणिक कार्यास सुरुवात केली. शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षक म्हणून आज माझी 21 वर्षे पूर्ण झाली. आजही मला माझा  शाळेचा पहिला दिवस जसाच्या तसा आठवतो. 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही मला माझा प्रत्येक दिवस पहिलाच आणि नवीनच  वाटतो. दररोज नवीन काहीतरी शिकावं आणि विद्यार्थ्यांना शिकवावं असं वाटतं. शिक्षक म्हणून घडविण्यात मला माझे आईवडील,आत्या- आणि मामा,माझे सर्व नातेवाईक आणि मला शिकवणारे सर्व शिक्षक,ज्या गुरूजन अध्यापक विद्यालय पाटण,जि. सातारा येथे मी शिक्षक म्हणून घडलो तेथील माझे सर्व गुरूजन,आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शिकवता-शिकवता मीच शिक्षक म्हणून घडत होतो.ते माझे आदर्श विद्यालय व साधना विद्यालय हडपसर येथील विद्यार्थी,आतापर्यंत मला लाभलेले माझे सर्व मुख्याध्यापक आणि सहकारी यांचा मी ऋणी आहे. तुमच्या सर्वांमुळेच मी शिक्षक म्हणून घडलो.        मागे वळून पाहतान...

माणूसकी.

  माझ्या वाचकमित्रांनो!       "खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे ". मातृहदयी कवी साने गुरूजी सांगतात कोणालाही तुच्छ लेखू नये.कुणालाही हिणवू नये.आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहोत. सर्वांशी प्रेमाने वागावे. प्रेम द्यावे आणि घ्यावे. जगात ज्यांना कोणीही नाही त्यांना आधार द्यावा. दु:खी ,कष्टी लोकांना समजून घ्यावे. त्यांचे दु:ख दूर करण्याचा प्रयत्न करावा.      या जगात सर्वात सुंदर काय असेल तर ते माणसाने ,माणसाशी ,माणसासारखे वागणे.माणूसकीने वागणे. ज्याच्याकडे माणुसकी आहे ती व्यक्ती जगातील सर्वात श्रीमंत आणि सुंदर व्यक्ती असते. माणूसकी हा माणसाचा सर्वात सुंदर दागिना आहे.माणूसकी म्हणजे नक्की काय?"माणूसकी म्हणजे "मी" माणूस व बाकीचेही " माणूस  " हे समजून वागणे होय.माणसाने माणसाला समजून घेतले तर जगातील सर्व समस्या दूर होतील.कोणताही भेदभाव राहणार नाही.जो इतरांशी प्रेमाने,मायेने आणि माणूसकीने वागतो त्याच्याच हदयात परमेश्वराचे वास्तव्य असते.        परमेश्वर कुठे असतो. कवी कुसुमाग्रज " स्वातंत्र्यदेवीची विनवणी "या कवितेत म्हणतात, "पन्नाशीची...

राग

        माझ्या वाचक मित्रांनो!           काही परिस्थितीत आपला संयम सुटतो आणि राग अनावर होतो. राग येणं ही नैसर्गिक व स्वाभाविक गोष्ट आहे.परंतु राग नियंत्रित करणं ही प्रयत्नाने सहजसाध्य गोष्ट आहे.राग कधी आणि कुठे व्यक्त करावा? व राग कुठे व्यक्त करू नये ही मनाचा संयम पाहणारी गोष्ट आहे. राग म्हणजे एकप्रकारची त्रासिक स्थिती आहे. राग हा काही काळापुरताच टिकतो. हळूहळू तो कमी होतो. कालांतराने तो संपतोही. राग आल्यानंतर लगेच व्यक्त न होता काही काळ थांबले, काहीच कृती केली नाही तर राग नियंत्रित होतो. राग आल्यावर थांबणं हा एक रामबाण उपाय आहे.         रागाचा परिणाम आपण ज्या व्यक्तीवर रागावतो त्यापेक्षा आपल्यावरच जास्त होतो. आपण एखाद्या व्यक्तीवर रागावतो म्हणजे नेमकं काय? रागावणं हे त्या व्यक्तीवर नसतं तर ते त्या व्यक्तीच्या बोलण्यावर,वागण्यावर प्रासंगिक असतं. काही काळ आपण शांत राहिलो तर तीच व्यक्ती आपल्याला हवीहवीशी वाटते. म्हणजे राग हा क्षणिक आहे.          राग आल्यावर आपण ज्या काही गोष्टी करतो,खरंतर त्या विचार न...

पुस्तकांसाठी घर

      माझ्या वाचकमित्रांनो!       जगात काही लोक यशस्वी होतात तर काही अपयशी होतात...यशस्वी लोक वेगळं असं काही करत नाही,परंतु ते जे काही करतात तेच वेगळ्या प्रकारे करतात. हेच खरं यशाचं गमक आहे. जगात सर्वात श्रीमंत कोण असतो.... असं विचारल्यावर आपल्यासमोर अनेक नावं येतात. परंतु फक्त संपत्ती म्हणजे श्रीमंती नाही. तर ज्याच्याजवळ बुद्धीचं धन आहे तोच खरा श्रीमंत होय.पुस्तकप्रेमी मनुष्य जगातील सर्वात सुखी व श्रीमंत मनुष्य असतो. महापुरूषांचा जर आपण विचार केला तर ते जीवनात कमी व पुस्तकातच जास्त असतात. सदैव वाचन हेच त्यांच्या यशाचं गमक आहे.           माणूस राहण्यासाठी घर बांधतो. परंतु पुस्तकांसाठी घर बांधणे ही गोष्टच आपल्याला वेगळी वाटते. अविश्वसनीय वाटते. इतिहासाची पाने चाळताना आपण बऱ्याच गोष्टी नाविन्यपूर्ण व वेगळ्या पाहतो,अनुभवतो. 'जाॅर्ज पंपनच्या स्वागतासाठी भारतात- मुंबईत कोणीतरी 'गेट वे ऑफ इंडिया 'बांधले. शहाजहानने प्रिय पत्नी मुमताजमहल साठी 'जगप्रसिद्ध ताजमहाल' बांधला. अनेकांनी राजे- रजवाडे,शिशमहल बांधले. तर कोणी सुंदर मंदिरे बांधली. मुस्...

ज्ञानसूर्य

  ज्ञानसूर्य      अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत,परिस्थितीला न डगमगता,अस्पृश्यता,गरिबीला सामोरे जाऊन शिक्षणातील नेपोलियन म्हणून ज्यांची जगभर ख्याती आहे. अशा विश्वरत्न,ज्ञानसूर्य,भारतरत्न डाॅ.भिमराव रामजी आंबेडकर अर्थातच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्तृत्व हे सदैव सर्वांना प्रेरणा देणारे व दिशादर्शक आहे.      डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्चशिक्षण मुंबई विद्यापीठ,अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ व इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्स व जर्मनीतील बाॅन विद्यापीठ इथे पूर्ण केले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या हयातीत भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्चविद्याविभूषित व्यक्ती होते.भारतसरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर 64 विषयांमध्ये तज्ज्ञ होते. त्यांच्या मुख्य पदव्या बी.ए.,दोनदा एम.ए.,पी.एच.डी.,एम.एस.सी.,बार अॅट लाॅ,डी.एस.सी. व एल.एल.डी आणि डी. लिट.,अशा होत्या.           जगात ज्ञानाचा गौरव होतो. पैसे,पद,प्रतिष्ठा अधिकार  या सर्वांपेक्षा ज्ञान,बुद्धीमत्ता नेहम...

कृष्ण व्हा..

            माझ्या बालमित्रांनो,आणि वाचकमित्रांनो!             अनेक जण जीवन जगताना जीवनाबद्दल,परिस्थितीबद्दल, व्यक्तींबद्दल,नातेवाईकांबद्दल अनेकदा तक्रारी करताना दिसतात.मला चांगले नातेवाईकच नाहीत,मला जास्त वेळच मिळत नाही. मला समाधानच मिळत नाही...काही-काही जण तर मला चांगलं घरंच मिळालं नाही अशीही तक्रार करतात. खरं तर प्रत्येकाकडेच अडचणी,तक्रारी,समस्या या असतातच. परंतु जीवनाकडे सकारात्मक बघण्याचा दृष्टीकोन असेल तर माणूस परिस्थिती आणि पर्यायाने सर्व कमी - अधिक गोष्टी स्वीकारतो. आहे त्या परिस्थितीत समाधान मानतो. आणि आनंदी राहतो.        जन्म आणि मृत्यू यांमधील अंतर म्हणजे जीवन होय.जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नसतात. परंतु जीवन कसं जगायचं,परिस्थितीला सामोरं कसं जायचं हे मात्र आपल्याच हाती असतं. आहे त्यात समाधान मानायचं की, नाही त्याचं दुःख करत बसायचं हे सर्वस्वी आपल्याच हाती असतं. जीवनाकडे कसं पाहावं हे सांगताना कवीश्रेष्ठ मंगेश पाडगांवकर एका कवितेत म्हणतात...  "सांगा कसं जगायचं, कण्...