पोस्ट्स

राग

        माझ्या वाचक मित्रांनो!           काही परिस्थितीत आपला संयम सुटतो आणि राग अनावर होतो. राग येणं ही नैसर्गिक व स्वाभाविक गोष्ट आहे.परंतु राग नियंत्रित करणं ही प्रयत्नाने सहजसाध्य गोष्ट आहे.राग कधी आणि कुठे व्यक्त करावा? व राग कुठे व्यक्त करू नये ही मनाचा संयम पाहणारी गोष्ट आहे. राग म्हणजे एकप्रकारची त्रासिक स्थिती आहे. राग हा काही काळापुरताच टिकतो. हळूहळू तो कमी होतो. कालांतराने तो संपतोही. राग आल्यानंतर लगेच व्यक्त न होता काही काळ थांबले, काहीच कृती केली नाही तर राग नियंत्रित होतो. राग आल्यावर थांबणं हा एक रामबाण उपाय आहे.         रागाचा परिणाम आपण ज्या व्यक्तीवर रागावतो त्यापेक्षा आपल्यावरच जास्त होतो. आपण एखाद्या व्यक्तीवर रागावतो म्हणजे नेमकं काय? रागावणं हे त्या व्यक्तीवर नसतं तर ते त्या व्यक्तीच्या बोलण्यावर,वागण्यावर प्रासंगिक असतं. काही काळ आपण शांत राहिलो तर तीच व्यक्ती आपल्याला हवीहवीशी वाटते. म्हणजे राग हा क्षणिक आहे.          राग आल्यावर आपण ज्या काही गोष्टी करतो,खरंतर त्या विचार न...

पुस्तकांसाठी घर

      माझ्या वाचकमित्रांनो!       जगात काही लोक यशस्वी होतात तर काही अपयशी होतात...यशस्वी लोक वेगळं असं काही करत नाही,परंतु ते जे काही करतात तेच वेगळ्या प्रकारे करतात. हेच खरं यशाचं गमक आहे. जगात सर्वात श्रीमंत कोण असतो.... असं विचारल्यावर आपल्यासमोर अनेक नावं येतात. परंतु फक्त संपत्ती म्हणजे श्रीमंती नाही. तर ज्याच्याजवळ बुद्धीचं धन आहे तोच खरा श्रीमंत होय.पुस्तकप्रेमी मनुष्य जगातील सर्वात सुखी व श्रीमंत मनुष्य असतो. महापुरूषांचा जर आपण विचार केला तर ते जीवनात कमी व पुस्तकातच जास्त असतात. सदैव वाचन हेच त्यांच्या यशाचं गमक आहे.           माणूस राहण्यासाठी घर बांधतो. परंतु पुस्तकांसाठी घर बांधणे ही गोष्टच आपल्याला वेगळी वाटते. अविश्वसनीय वाटते. इतिहासाची पाने चाळताना आपण बऱ्याच गोष्टी नाविन्यपूर्ण व वेगळ्या पाहतो,अनुभवतो. 'जाॅर्ज पंपनच्या स्वागतासाठी भारतात- मुंबईत कोणीतरी 'गेट वे ऑफ इंडिया 'बांधले. शहाजहानने प्रिय पत्नी मुमताजमहल साठी 'जगप्रसिद्ध ताजमहाल' बांधला. अनेकांनी राजे- रजवाडे,शिशमहल बांधले. तर कोणी सुंदर मंदिरे बांधली. मुस्...

ज्ञानसूर्य

  ज्ञानसूर्य      अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत,परिस्थितीला न डगमगता,अस्पृश्यता,गरिबीला सामोरे जाऊन शिक्षणातील नेपोलियन म्हणून ज्यांची जगभर ख्याती आहे. अशा विश्वरत्न,ज्ञानसूर्य,भारतरत्न डाॅ.भिमराव रामजी आंबेडकर अर्थातच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्तृत्व हे सदैव सर्वांना प्रेरणा देणारे व दिशादर्शक आहे.      डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्चशिक्षण मुंबई विद्यापीठ,अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ व इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्स व जर्मनीतील बाॅन विद्यापीठ इथे पूर्ण केले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या हयातीत भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्चविद्याविभूषित व्यक्ती होते.भारतसरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर 64 विषयांमध्ये तज्ज्ञ होते. त्यांच्या मुख्य पदव्या बी.ए.,दोनदा एम.ए.,पी.एच.डी.,एम.एस.सी.,बार अॅट लाॅ,डी.एस.सी. व एल.एल.डी आणि डी. लिट.,अशा होत्या.           जगात ज्ञानाचा गौरव होतो. पैसे,पद,प्रतिष्ठा अधिकार  या सर्वांपेक्षा ज्ञान,बुद्धीमत्ता नेहम...

कृष्ण व्हा..

            माझ्या बालमित्रांनो,आणि वाचकमित्रांनो!             अनेक जण जीवन जगताना जीवनाबद्दल,परिस्थितीबद्दल, व्यक्तींबद्दल,नातेवाईकांबद्दल अनेकदा तक्रारी करताना दिसतात.मला चांगले नातेवाईकच नाहीत,मला जास्त वेळच मिळत नाही. मला समाधानच मिळत नाही...काही-काही जण तर मला चांगलं घरंच मिळालं नाही अशीही तक्रार करतात. खरं तर प्रत्येकाकडेच अडचणी,तक्रारी,समस्या या असतातच. परंतु जीवनाकडे सकारात्मक बघण्याचा दृष्टीकोन असेल तर माणूस परिस्थिती आणि पर्यायाने सर्व कमी - अधिक गोष्टी स्वीकारतो. आहे त्या परिस्थितीत समाधान मानतो. आणि आनंदी राहतो.        जन्म आणि मृत्यू यांमधील अंतर म्हणजे जीवन होय.जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नसतात. परंतु जीवन कसं जगायचं,परिस्थितीला सामोरं कसं जायचं हे मात्र आपल्याच हाती असतं. आहे त्यात समाधान मानायचं की, नाही त्याचं दुःख करत बसायचं हे सर्वस्वी आपल्याच हाती असतं. जीवनाकडे कसं पाहावं हे सांगताना कवीश्रेष्ठ मंगेश पाडगांवकर एका कवितेत म्हणतात...  "सांगा कसं जगायचं, कण्...

नैतिकता

            आपण विचार करतो का ? प्रिय वाचक मित्र,माझे स्नेही आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मित्र-मैत्रिणींनो .......        आपण वेगवेगळ्या विषयांवर नेहमीच आपले मत ,आपल्या अपेक्षा, इतरांसमोर मांडत असतो. त्या पूर्ण कशा कराव्यात, किंवा आपणच आपल्या पूर्ण न होणाऱ्या अपेक्षांचे ओझे, आयुष्यभर कसे सांभाळतो ? याचाही आपण बऱ्याचदा विचार करतो. पण मला प्रामाणिकपणे असे वाटते की ,या सर्व अपेक्षा पूर्ण होण्यासाठी या- ना त्याप्रकारे आपल्या पालकांची किंवा जोडीदाराची आपल्याला खंबीर अशी साथ मिळते. पण यासाठी आपल्यासमोर एखादे ध्येय असायला हवे. खरंतर ध्येयवादी आणि ध्येयवेडे हे दोन शब्द प्रकर्षाने वेगळे दिसत असले, तरी ते आपल्या जीवनात मोलाचा वाटा उचलत असतात .आपल्यातील प्रामाणिकता, सामंजस्यता जशी महत्त्वाची असते, तसाच नैतिकता हा शब्द आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे.            नैतिकतेबद्दल  बोलायचे झाले ,तर खाजगीत बोलण्याचे, चालण्याचे ,सारे जीवनतरंग चारचौघात बोलले जातात. पण नको ते, नको त्या वयात ऐकल्यामुळे, पाहिल्यामुळे नै...

वाचाल तर वाचाल

  वाचाल तर वाचाल.            आपल्या सर्वांच्या कानीकपाळी सध्या एकच वाक्य कायम पडत असतं. ' अरे मुलांनो जरा वाचा रे ... घरी आई-वडील आणि शाळेत शिक्षक सारखेच सांगतात. मुलांनो खूप वाचन करा ..पुस्तके वाचा कादंबरी वाचा, वर्तमानपत्र वाचा, गोष्टी वाचा, वाचत रहा . मग आपल्या सर्वांना प्रश्न पडतो खरंच एवढं का वाचायचं? काय फायदा या वाचनाचा ? चला तर समजून घेऊया विषय चला वाचू आनंदे.      " दिसामाजी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचीत जावे." समर्थ रामदास यांनी वरील शब्दात वाचनाचे महत्त्व सांगितले आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनाचे महत्त्व सांगताना म्हणतात, "वाचाल तर वाचाल ". तर फ्रान्सिस बेकन नावाचे इंग्रजी लेखक म्हणतात 'वाचन परिपूर्ण माणूस बनवते .वाचनामुळे उत्तम व्यक्तिमत्व घडते .वाचनामुळे माणूस सर्वज्ञानी होतो ,समृद्ध होतो. इतके सारे वाचनाचे महत्त्व आहे . एवढंच नाही तर पुस्तक प्रेमी मनुष्य जगातील सर्वात सुखी व श्रीमंत असतो , असेही म्हणतात.              वाचन हा एक अतिशय समृद्ध करणारा छंद मानला जातो. पु...

आधुनिक ज्ञानभगीरथ - कर्मवीर भाऊराव पाटील

  कर्मवीर भाऊराव पाटील.      महाराष्ट्र हा दगड धोंड्यांचा देश.अंजन कांचन  कडे -कपाऱ्यांचा देश. भले रत्नांची खाण या मातीत नसेलही ,पण  नररत्नांची खाण मात्र या महाराष्ट्रात निश्चितच आहे. त्यापैकीच एक देदीप्यमान रत्न म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील. भव्य देहयष्टी, छातीपर्यंत रुळणारी पांढरी शुभ्र दाढी, प्रभावी व्यक्तिमत्व, पहाडी आवाज, अमोघ वक्तृत्व, असे एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व.                            100 वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज ओळखणारे ,ग्रामीण शिक्षण चळवळीचे जनक म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील. संपूर्ण महाराष्ट्रभर अनवानी फिरून कर्मवीर भाऊरावांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला. गोरगरिबांच्या झोपडी पर्यंत शिक्षणाची गंगोत्री पोहोचवण्याचे कार्य केले. लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन आपल्या कार्यात सहभागी करून घेतले. लोकशाहीचा मूळ गाभा लोकशिक्षण आहे आणि लोकशिक्षण समाजाला विकासाकडे नेते , हे कर्मवीरांना ठाऊक होते .           ...