पोस्ट्स

नैतिकता

            आपण विचार करतो का ? प्रिय वाचक मित्र,माझे स्नेही आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मित्र-मैत्रिणींनो .......        आपण वेगवेगळ्या विषयांवर नेहमीच आपले मत ,आपल्या अपेक्षा, इतरांसमोर मांडत असतो. त्या पूर्ण कशा कराव्यात, किंवा आपणच आपल्या पूर्ण न होणाऱ्या अपेक्षांचे ओझे, आयुष्यभर कसे सांभाळतो ? याचाही आपण बऱ्याचदा विचार करतो. पण मला प्रामाणिकपणे असे वाटते की ,या सर्व अपेक्षा पूर्ण होण्यासाठी या- ना त्याप्रकारे आपल्या पालकांची किंवा जोडीदाराची आपल्याला खंबीर अशी साथ मिळते. पण यासाठी आपल्यासमोर एखादे ध्येय असायला हवे. खरंतर ध्येयवादी आणि ध्येयवेडे हे दोन शब्द प्रकर्षाने वेगळे दिसत असले, तरी ते आपल्या जीवनात मोलाचा वाटा उचलत असतात .आपल्यातील प्रामाणिकता, सामंजस्यता जशी महत्त्वाची असते, तसाच नैतिकता हा शब्द आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे.            नैतिकतेबद्दल  बोलायचे झाले ,तर खाजगीत बोलण्याचे, चालण्याचे ,सारे जीवनतरंग चारचौघात बोलले जातात. पण नको ते, नको त्या वयात ऐकल्यामुळे, पाहिल्यामुळे नै...

वाचाल तर वाचाल

  वाचाल तर वाचाल.            आपल्या सर्वांच्या कानीकपाळी सध्या एकच वाक्य कायम पडत असतं. ' अरे मुलांनो जरा वाचा रे ... घरी आई-वडील आणि शाळेत शिक्षक सारखेच सांगतात. मुलांनो खूप वाचन करा ..पुस्तके वाचा कादंबरी वाचा, वर्तमानपत्र वाचा, गोष्टी वाचा, वाचत रहा . मग आपल्या सर्वांना प्रश्न पडतो खरंच एवढं का वाचायचं? काय फायदा या वाचनाचा ? चला तर समजून घेऊया विषय चला वाचू आनंदे.      " दिसामाजी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचीत जावे." समर्थ रामदास यांनी वरील शब्दात वाचनाचे महत्त्व सांगितले आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनाचे महत्त्व सांगताना म्हणतात, "वाचाल तर वाचाल ". तर फ्रान्सिस बेकन नावाचे इंग्रजी लेखक म्हणतात 'वाचन परिपूर्ण माणूस बनवते .वाचनामुळे उत्तम व्यक्तिमत्व घडते .वाचनामुळे माणूस सर्वज्ञानी होतो ,समृद्ध होतो. इतके सारे वाचनाचे महत्त्व आहे . एवढंच नाही तर पुस्तक प्रेमी मनुष्य जगातील सर्वात सुखी व श्रीमंत असतो , असेही म्हणतात.              वाचन हा एक अतिशय समृद्ध करणारा छंद मानला जातो. पु...

आधुनिक ज्ञानभगीरथ - कर्मवीर भाऊराव पाटील

  कर्मवीर भाऊराव पाटील.      महाराष्ट्र हा दगड धोंड्यांचा देश.अंजन कांचन  कडे -कपाऱ्यांचा देश. भले रत्नांची खाण या मातीत नसेलही ,पण  नररत्नांची खाण मात्र या महाराष्ट्रात निश्चितच आहे. त्यापैकीच एक देदीप्यमान रत्न म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील. भव्य देहयष्टी, छातीपर्यंत रुळणारी पांढरी शुभ्र दाढी, प्रभावी व्यक्तिमत्व, पहाडी आवाज, अमोघ वक्तृत्व, असे एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व.                            100 वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज ओळखणारे ,ग्रामीण शिक्षण चळवळीचे जनक म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील. संपूर्ण महाराष्ट्रभर अनवानी फिरून कर्मवीर भाऊरावांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला. गोरगरिबांच्या झोपडी पर्यंत शिक्षणाची गंगोत्री पोहोचवण्याचे कार्य केले. लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन आपल्या कार्यात सहभागी करून घेतले. लोकशाहीचा मूळ गाभा लोकशिक्षण आहे आणि लोकशिक्षण समाजाला विकासाकडे नेते , हे कर्मवीरांना ठाऊक होते .           ...

गंधर्व आणि गंधर्वलोक.

  नमस्कार वाचक मित्रहो.            सर्वप्रथम आज आपण देवादिकांचे मनोरंजन करणारे गंधर्व आणि गंधर्वलोक याविषयी माहिती घेणार आहोत.    गंधर्व म्हटंल आपल्याला कुतुहल वाटतं. गंधर्व म्हटंल की आपल्या डोळ्यासमोर येतात ते कलाकार. आणि लोकमान्य टिळक यांनी नारायण श्रीपाद राजहंस यांना म्हटंलेलं वाक्य आठवतं. "अरे हे तर बालगंधर्व. गंधर्वांना अर्धदेव असेही म्हणतात. त्यांना देवांपैकी निम्नपदाचा दर्जा होता.गंधर्व ही एक व्यक्ती नसून ती एक जमात किंवा समूह होता. देवादिकांचे मनोरंजन करणारे कलाकार म्हणजेच गंधर्व होय. दक्षिण भारतात गंधर्वांची पूजा करतात. विद्येची देवता सरस्वती विणा वाजवताना गंधर्व या कलाकार समूहांचा जन्म झाला असं मानतात. गंधर्व जमातीचे,समूहचे अंतरिक्षात वास्तव्य असते असं मानलं जायचं. त्यांच्या वास्तव्य ठिकाणाला गंधर्वलोक असं म्हणतात.       स्वर्गात देवांच्या अनेक प्रजाती राहत होत्या.प्रजाती म्हणजेच प्रकार असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. तेहतीस कोटी देव ही संकल्पना आपल्याकडे आहे. त्यापैकी गंधर्वांना अर्धदेव किंवा उपदेवांचा दर्जा होता. स्...